Ashoka education philanthropy report नुसार सामान्य भारतीय जेवढे दान करतात तेवढे अगदी income च्या टक्केवारीत भारतीय श्रीमंत मग त्यात उद्योगपती, नेते, अभिनेते ही करीत नाही. तुम्हाला हा आकडा ऐकून आश्चर्याचा सुखद धक्का बसेल की केवळ 2025 यावर्षात सामान्य भारतीय माणसाने तब्बल 540 अरब दान केले आहे, याचे कोटीत आकडे किती होता याचा आपण फक्त विचार करून बघा आणि हे दान ही सामान्य लोक परोपकार या भावनेतून करतात ज्याचे मूळ हिंदू धर्मातून आले आहे. त्यात मंदिराच्या दानपेटी, मंदिर आर्थिक मदत, धर्मकार्य या प्रकारांचा क्रमांक वरचा आहे. येथे खेदानेच सांगावेसे वाटते की या ठिकाणी केलेले दान सुविधांच्या रूपाने मात्र खूप कमी मंदिर ट्रस्ट परत करतात. अनेकदा तर मनस्ताप होतो. त्याचे कदाचित महत्वाचे कारण सरकारच्या हातात मंदिरांच्या तिजोऱ्या हे असावे. परंतु समाधानाची आणि दिलासादायक बाब ही गर्भ श्रीमंतांपेक्षा भारतीय सामान्य माणूस त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत खूप अधिक प्रमाणात दानशूर आहे. म्हणून त्याला दि.सेपिअन्स न्यूजचे मनापासून अभिवादन.





