तुम्ही ADG राहुल गोपाल यांना ओळखत असाल ज्यांना पसरिचा साहेब ACB ADG असताना ट्रॅपमध्ये अडकविण्यात आलेले अर्थात ज्याचे कारण departmental dirty politics होते हे सर्वश्रुत होते कारण पसरिच्यांना DG व्हायचं होतं जे राहुल गोपाल अडसर होते. त्यासाठी त्यांना उध्वस्त करण्याचा हा प्लान होता असे बोलले जाते. साध्या शिपायावर ट्रॅप होणाऱ्या बातम्या लीक होतात पण ADG न ची झाली नाही. असो विषय हा नाही विषय आहे वेळ आल्यावर दिग्गज ही किती लाचार होतात हे येथे कथन करणे. जेव्हा साहेबाना पकडण्यात आले तेव्हा त्यांना जेल मध्ये ठेवण्यात आले ते जेल ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रभावात होते त्यांना त्यावेळी एक कॉल आला नंबर save नव्हता पण तिकडं पहिल वाक्य होत मी RG ची पत्नी बोलते आपल्याला एक विनंती होती ते अधिकारी अतिशय अदबीने त्यांना म्हणाले बोला मॅम विनंतीची आवश्यकता नाही. विनंती होती साहेबाना घरचे जेवण आम्ही देऊ शकतो का कृपया त्यांना ते देण्याची परवानगी द्यावी. ती इतकी साधीशी विनंती एका ADG न च्या पत्नीने केली होती तीही या त्यांच्या नवऱ्या पेक्षा कितीतरी लहान असलेल्या पदावरील व्यक्तीस. परंतु ही विनंती करण्याची पाळी त्यांच्यावर आली का ? तर डिपार्टमेंट मधील डर्टी पॉलिटिक्स आणि कुठेतरी झालेला थोडासा लोभ. जो एवढ्या मोठ्या पदावरील आणि विभागात मोठा दरारा असलेल्या व्यक्तीस जेलमध्ये पाठविण्यास कारणीभूत ठरला. हे सर्व सांगताना प्रकर्षाने हे नमूद करावसं वाटतं की विभागात फक्त आणि फक्त खो-खो आणि कबड्डी चालते आणि ते ही अतिशय वाईट पद्धतीने आपलेच कलिंग आपली अशा प्रकारे खोततात की वर येणे अनेकदा मुश्किल होऊन जाते. पावलो पावली आपल्याच लोकांनी आपल्यासाठी सापळे रचून ठेवलेलं खातं म्हणजे पोलीस खातं येथे कधी कुणाला कशी लाचारी येईल सांगन अवघड. जी प्रत्येकाला पूर्ण सर्विसमध्ये एकदा तरी येतेच. ज्यात अनेकदा संबंधित व्यक्तीचे कुटुंब देखील वाईट पद्धतीने भरडल्या जाते.





