हा लेख केवळ त्यांच्या संदर्भात आहे जे गुन्हेगारी वृत्ती, व्यभिचार आणि विकृत लालसा पोसचतात त्यांना लक्ष करून केलेला आहे त्यात सर्वसामान्यांचा किंवा कुठल्या लिंग विशेषाचा कोणताही संबंध नाही.
खरातने आजवरचे सर्व समज, गैरसमज, समीकरणे पुसले, फाडले, फोडले. याचेच विश्लेषण पुढे दिले आहे जे नक्कीच कुणाला आवडणार नाही कारण अनेकदा सत्य पचवणं अवघड जातं. पण त्याच्या सत्यते विषयी कुणालाही शंका नक्कीच नसेल. यातनं समाजाने काय शिकावं हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न जरी असला तरी सामाजिक स्तरावरती हे अतिशय घातक उदाहरण आहे. जे मानवी नात्यांना केवळ तडा देण्याचीच नाही तर उध्वस्त करण्याची कु-क्षमता ठेवते. जी एक समाज व सहजीवन म्हणून अतिशय चिंतेची व क्लेशदायी गोष्ट आहे.
1 स्त्रिया केवळ विद्वत्ता, सुंदरता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा यावरच भाळतात हा निव्वळ गैरसमज आहे. काही खरात सारख्या अंगापिंडाने 0 असलेल्या 69 वयाच्या म्हाताऱ्यावर 30 नी 35 वर्षांच्या उच्चशिक्षित, श्रीमंत, उच्चपदस्थ व समजात मोठी प्रतिष्ठा, पद, वाचक असलेल्यांच्या ही बायका जर या सारख्या का…वड्या गेंड्याला पटत असतील तर स्त्रीच्या मनाचा (अर्थात काही) ठाव कुणालाच लागू शकत नाही हेच म्हणावं लागेल.
2 उच्चशिक्षित, उच्च, पदस्थ, श्रीमंत सामाजिक स्तरावर वजन असलेल्या, हँडसम, डॅशिंग, सुदृढ, आरोग्य संपन्न पुरुषांनी आपल्याकडे असलेल्या या गोष्टींचा कधीही गर्व करू नये तुमचा म** कधी कोण म्हातारा का..वड्डा ही उडवेल हे तुम्हालाही कळणार नाही.
3 सामाजिक स्तरावर स्वतःला स्थापित करण्याकरिता फार हुशारी लागत नाही फक्त तुम्हाला वेड्यात काढायच टेक्निक यायला हवं. ते आलं की तुम्ही चिंचुके देखील सोन्याच्या नाही हिऱ्याच्या भावाने विकू शकता.
4 स्वतःला अति हुशार समजणारे काही नोकरशहा, आयएएस, आयपीएस तसेच जनतेला वेड्यात काढून स्वतःला अतिशय चालाख समजत घटनात्मक पदावर बसलेले नेतेमंडळी यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबाला देखील झुकवताच नाही तर वेगवेगळे आसने करत वाकवता देखील येते हे दहावी नापास खरात ने दाखवून दिले.
5 सामाजिक स्तरावर पुढे जाण्यासाठी राजकीय व नोकरशाहीचा वरदहस्त आवश्यक असतो आणि या दोघांनाही मोठमोठे प्रॉब्लेम्स असतात ते ओळखून कृती केल्यास समाजाच्या प्रत्येक घटकावर आपण अधिपथ्य गाजवू शकतो.
6 श्रद्धा आणि भीती हे जगातील सर्वात मोठे अस्र शस्त्र आहेत लोकांना नियंत्रित करण्याचे, त्यांच्यावर अधिराज्य गाजवण्याचे आणि त्यांना आपल्या इच्छेनुसार वागवण्याचे. फक्त त्याचे भांडवल करता यायला हवे मग जग तुमच्या पायाशी असेल.
7 पुरुषांना असे वाटते की स्त्री त्यांच्या हातात आहे, त्यांच्या पायाशी आहे आणि त्यांच्या बोटावर नाचते, तिला ते कसेही वागवू शकतात परंतु हे निखालस खोटे आहे. उलट पक्षी याच्या उलट असू शकते.
8 या घटनेमुळे अनेक विद्वानांना असे वाटत असेल की आपण देखील बाबा बुवा व्हावे. कारण एवढा विलास त्याचबरोबर वैभव आणि वर्षानुवर्ष सामाजिक स्तरावरती आदर व धाक क्वचितच कोणत्या ही उद्योग व्यवसायात मिळत असावा.
9 यापुढे कोणताही पुरुष स्त्रीला शिल्लक मानण्याचा मूर्खपणा करणार नाही.
10 वरील सर्व मुद्दे जरी योग्य सत्य असले तरी देखील यात कौटुंबिक कलह आत्महत्या स्त्रियांवरील अविश्वास वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सुलक्षणी, शालीन आणि स्त्रीत्वाचे संगोपन, संवर्धन, सशक्तीकरण त्याचबरोबर त्यांना उज्वल भविष्य देणाऱ्या महिलांना व विचारांना तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्याला जबाबदार निकृष्ट दर्जाच्या काही त्या स्त्रियांबरोबर काही पुरुष देखील आहे
संपादक : शिरीष प्रभाकर चव्हाण
The Sapiens News तथा RTI ACTIVIST




