The Sapiens News

दि.सेपिअन्स न्युज

The Sapiens News

दि. सेपिअन्स न्युज

5 कारणे : अतिउच्चक क्षमता असलेल्या एलसीबीची का लागते आहे वाट ?

ग्रामीण LCB सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत असली तरी या शाखेचा लौकिक खूप मोठा आहे मी या शाखेला 1995 पासून अतिशय जवळून पाहतो आहे. या शाखेने आजवर खूप मोठमोठ्या गुन्ह्यांचा छडा लावला असून या ब्रांचमधील अधिकारीच नाही तर कर्मचारी देखील खूप उत्तम प्रकारे आणि कौतुकास्पद काम करणारे होते आणि आजही बहुतांश आहेत. मग प्रश्न हा आहे की या ब्रांचची सध्या एवढी दुरावस्था झाल्याचे का दिसते आहे, का ? इथे कुणीच काम करत नाही का ? तर याचे उत्तर हे आहे की बहुतांश कर्मचारी येथे जीव ओतून काम करतात. गुन्ह्यांचा आणि गुन्हेगारांचा छडा देखील लावतात. परंतु आज जी काही बदनामी या शाखेची होते आहे त्यासाठी पुढील गोष्टी जबाबदार आहे.
1 कमकुवत व हळवं नेतृत्व. तसेच उपद्रवी कर्मचाऱ्यांच्या काव्यामुळे डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेलेल नेतृत्व. असं समजा सेनापतीच शिपायाला घाबरतो. Hold नसल्याची कमी.
2 ठरावीक व गलिच्छ आणि फिरून फिरून येणाऱ्या मक्तेदार, गुन्हेगार वृत्तीच्या निवडक कर्मचाऱ्यांकडे असलेले या शाखेचे नियंत्रण व इतर प्रामाणिक कर्मचाऱ्यांची गळशेपे.
3 निवडक कर्मचाऱ्यांनी पाया पडून मिळवलेला राजकीय वरदहस्त. ठराविक लोकांकडेच असलेले निर्बंध, अधिकार व सत्ता. अंतर्गत गटबाजी.
4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची हतबलता.
5 कर्मचारी व अधिकारी यांचा एकमेका प्रति असलेला अविश्वास.

Vote Here

[TS_Poll id="1"]
UPSE Coaching

Recent Posts