परिक्षेत्राच्या सर्व मंत्रालयीन बांधवांना एक निवेदन कुणाला जर बदलीसाठी काही दिले असेल तर ते परत घ्या. प्रामाणिक कर्तव्यदक्ष, कर्मकठोर, नेतृत्व आले आहे. पैसे घेऊन बदली करणाऱ्या व भ्रष्ट अप्रामाणिक चापलूस लोकांचे पुढे खूप वाईट दिवस येणार आहे. पैसे तर बुडतीलच परंतु आड मार्गाने बदली केल्याचा फटका देखील बसेल. पैसे घेऊन बदली करून देणारा हा फ्रॉड आहे. दहा जणांचे पैसे खाऊन पाच जणांचा दुक्का लावतो. काहीच असे लोक एक्सपोज होणार आहे.
जर खरंच स्वच्छ कामासाठी प्रामाणिकपणे काम करण्याकरिता बदली हवी असेल तर सरळ वरिष्ठांना भेटा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. वरिष्ठ नाराज करणार नाही. त्यांना माणसे आणि त्यांचे प्रश्न चांगले ओळखताही येतात आणि त्यासाठी ते प्रयत्नशील देखील असतात. हा आमचा अनुभव आहे प्रामाणिक माणसाला न्याय मिळेलच ही आम्ही ग्वाही देतो. त्यामुळे चोराकडे जाऊ नका आणि खऱ्या विठू माऊलीला भजा खोट्या, भ्रष्ट, व्यभिचारी, स्वतःला माऊली म्हणून घेणाऱ्याला नाही. यथा तथा सर्वत्र भ्रष्ट व्यक्ती स्वतःचे देखील चांगले करू शकत नाही तो कुणाचे काय करणार ?म्हणून निवेदन विश्वास ठेवू नका पैसे घेऊन बदली करणाऱ्यांची माहिती आम्हाला द्या आम्ही त्याला चव्हाट्यावर आणू हे वचन देतो.





